बिद्री : 'वंचितांचे जीवन आपल्या साहित्यातून पहिल्यांदा साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.त्यामुळे ते वैश्विक दर्जाचे साहित्यिक आहेत'असे मत प्रा.डॉ.आनंद वारके यांनी व्यक्त केले.ते येथील दूधसाखर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते.
प्रा.डॉ.वारके पुढे म्हणाले,साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी अफाट प्रतिभा शक्तीच्या जोरावर कादंबरी,कथा,नाटक, पोवाडे,लावणीतून वंचित, शोषित, दलित यांच्या समस्या मांडून समाज परिवर्तनचा संदेश समाजाला दिला.तो आजही समाजाला उपयोगी आहे.
यावेळी लेखन प्रेरणा दिनानिमित्त कोणत्याही विषयावरील लेखन कोणत्याही साहित्य प्रकारात करावे,असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment