Wednesday, September 2, 2026

लोकमान्य टिळकांचा विचार आजही समाजाला आदर्शवतच आहे- प्राचार्य डॉ.संजय पाटील


बिद्री; (प्रतिनिधी), भारताच्या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व  मराठा या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील जे विचार मांडले ते त्या काळाबरोबरच आजच्या काळात ही आदर्शवतच आहेत. त्यांनी केलेले लेखन, त्यांनी घालून दिलेले आदर्श,स्वातंत्र्या विषयीचे कार्य आजही तरुण पिढीने स्वीकारले पाहिजेत असे मत  प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक जयंतीचे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन प्रवासा संबंधी आणि कार्याविषयी माहिती दिली. टिळकांनी सुरू केलेले वेगवेगळे सार्वजनिक उत्सव आज कोणत्या रूपाला पोहोचले आहेत याबद्दल खंत व्यक्त करून टिळकांच्या तत्कालीन उद्देशाचा विसर पडू नये अशा भावना व्यक्त केल्या. 
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ .आनंद वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा .सौ.सुहानी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दूधसाखर महाविद्यालयात "श्रावणधारा" भितीपत्रकाचे उद्घाटन


बिद्री , कविता ही जगण्याचे प्रतिबिंब असते .समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब कवी आपल्या प्रतिभेच्या साह्याने साहित्यात मांडत असतो.असेच अनुभव  महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने तयार केलेल्या "श्रावणधारा" या भितीपत्रकातील विद्यार्थ्यांच्या कवितांच्या मधून येतो  असे प्रतिपादन प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ .संजय पाटील यांनी केले. 
प्राचार्य डॉ.पाटील पुढे  म्हणाले, कविता,कथा इ .साहित्य लिहिणे म्हणजे एक आनंदी अनुभव असतो.कविता, कथा किंवा अन्य वाङ्ममय प्रकार लिहून झाल्यानंतर लेखकाला, कवीला एक वेगळा आनंद मिळतो हा आनंद आपल्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे.असे सांगून त्यांनी त्यांचे अभिनंदन व  पुढील लेखन प्रवासास   हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी कविता लिहिल्या त्यांची प्रतिनिधी म्हणून कु.अदिती कुलकर्णी व कु अदिती फराकटे यांनी आपल्या काव्य लेखनाविषयी  अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर आभार प्रो .डॉ .आनंद वारके यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  अर्जुन कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

अण्णा भाऊ साठे हे वैश्विक दर्जाचे साहित्यिक - प्रा. डॉ. आनंद वारके


बिद्री : 'वंचितांचे जीवन आपल्या साहित्यातून पहिल्यांदा साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.त्यामुळे ते वैश्विक दर्जाचे साहित्यिक आहेत'असे मत प्रा.डॉ.आनंद वारके यांनी व्यक्त केले.ते येथील दूधसाखर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. 
प्रा.डॉ.वारके पुढे म्हणाले,साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी अफाट प्रतिभा शक्तीच्या जोरावर कादंबरी,कथा,नाटक, पोवाडे,लावणीतून वंचित, शोषित, दलित यांच्या समस्या मांडून समाज परिवर्तनचा संदेश समाजाला दिला.तो आजही समाजाला उपयोगी आहे.
यावेळी लेखन प्रेरणा दिनानिमित्त कोणत्याही विषयावरील लेखन कोणत्याही साहित्य प्रकारात करावे,असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.
यावेळी महाविद्यालतील नॅकचे सह समन्वयक डॉ.एस.ए.साळोखे, प्राध्यापक,पालक श्री.खापरे,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रदीप कांबळे तर सूत्र संचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.

लोकमान्य टिळकांचा विचार आजही समाजाला आदर्शवतच आहे- प्राचार्य डॉ.संजय पाटील

बिद्री; (प्रतिनिधी), भारताच्या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व  मराठा या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्ष...