मराठी विभाग, दूधसाखर महाविद्यालय, बिद्री
Wednesday, February 5, 2025
जगण्याच्या अस्वस्थतेतून चांगली कविता जन्म घेते : प्राचार्य डॉ. संजय पाटील
बिद्री.कवितेमुळे माणसाला जगणे सहज सोपे होते,कारण जगण्याची अस्वस्थता कवितेतून कवी मांडत असतो, महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने कविता केली पाहिजे ते त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते असे मत प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या काव्यसंमेलनात व्यक्त केले. यावेळी अदिती कुलकर्णी ,साक्षी पाटील,सायली चव्हाण, कोमल कुंभार, सोनल जमनिक , गौरी घारे, प्रणय पाटील, ओंकार वाडकर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एच.डी धायगुडे प्रा.अविनाश कांबळे,प्रा. दिगंबर पाटील, प्र.किशोर पाटील, प्रा .सुनील सुतार,प्रा. सुहानी पाटील, प्रा.माया पाटील , प्रा. गौतम कांबळे यांच्या सोबत प्रा. डॉ. आनंद वारके यांनी कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ .प्रदीप कांबळे यांनी केले.
Thursday, January 30, 2025
सातत्याने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळते : अभिषेक पाटील
बिद्री.अभ्यासात सातत्य ठेवले व नवीन शिकण्याचा ध्यास ठेवल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. कठोर मेहनत आणि कोणताही शॉर्टकट न ठेवता सर्व गोष्टींचा ,सर्व विषयांचा सर्वांगीन अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन एमपीएससी परीक्षा पास होऊन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, मुंबई महाराष्ट्र राज्यअधिकार पदावर रोहा येथे कार्यरत असलेले अभिषेक पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त कोर्सच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवताना कसा संयम ठेवायला हवा , अभ्यासाच्या वेगवेगळ्या ट्रिक तसेच थोड्याशा यशाने हुरळून न जाता सातत्य ठेवले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. यावेळी अभिषेक पाटील यांचे वडील प्रा.आर.के.पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रा.डॉ.आनंद वारके उपस्थित होते.पाहुण्यांची ओळख प्रा.अतुल नगरकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sunday, January 5, 2025
वाढदिवसानिमित्त दूधसाखरच्या प्राचार्यांनी दिली विद्यार्थ्यांना अनोखी भेट.
बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात इतरत्र फिरत असताना, खेळत असताना विद्यार्थी,विद्यार्थिनी चक्कर येऊन पडतात किंवा काही छोटे मोठे अपघात होतात. अशा विद्यार्थ्यांना विशेषता विद्यार्थिनींना लेडीज रूम पर्यंत किंवा दवाखान्यात नेण्यासाठी गाडीपर्यंत घेऊन जाणे अशक्य होते. यासाठी प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या स्ट्रेचरवरून सुरक्षित ठिकाणी, रूममध्ये आणण्यासाठी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून स्ट्रेचर भेट दिले. प्राचार्य डॉ. संजय पाटील हे प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाला एक वाचन कट्टा बांधून देत असतात.आत्तापर्यंत त्यांनी महाविद्यालय परिसरात सात वाचनकट्टे बांधून दिलेले आहेत.ज्याचा वापर विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक,खेळाडू,ज्येष्ठ नागरिक करतात.तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी महाविद्यालयाला स्ट्रेचर भेट देताना बिद्री कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, रणजीत मुडूकशिवाले,संचालिका सौ .रंजना पाटील, सौ.क्रांती पाटील याबरोबरच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या भेटीबद्दल उपस्थित सर्वांनी प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
दूधसाखर महाविद्यालयात माझी साहित्यनिर्मिती या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शिवाजी देसाई विचारमंचावर प्राचार्य डॉ. संजय पाटील नॅक समन्वयक डॉ. एस. जी. खानापुरे, ग्रंथपाल अतुल नगरकर.
साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा: प्रा.शिवाजी देसाई
बिद्री.साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो.आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्या तो बघतो आणि आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तवाने मांडतो. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील निवडक साहित्याची मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. शिवाजी देसाई यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत नवोदित लेखकांशी संवाद या कार्यक्रमाचा.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साहित्य लेखनासंबंधी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना साहित्य लेखनासंबंधी मार्गदर्शन करताना साहित्याची मूलभूत तत्वे समजावून सांगितली. यावेळी विचार मंचावर ग्रंथपाल अतुल नगरकर,नॅक समन्वयक डॉ .एस.जी.खानापुरे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.आभार प्रा.डॉ.वैशाली कांबळे यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजी दूधवाटप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी
दूध पिऊन जल्लोष करा. प्राचार्य डॉ. संजय पाटील बिद्री.सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण दूध पिऊन जल्लोषात करूया असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. ते दूधसाखर महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजीच्या दूध वाटप्रसंगी बोलत होते. डॉ.पाटील पुढे म्हणाले, 31 डिसेंबर प्रत्येक वर्षी येतो परंतु तो आपला भारतीय सण नाही. पाश्यात्यांच्या अंधानुकरणातून आमचा आजचा तरुण व्यसनाधीन बनत आहे. आजच्या दिवसात विक्रमी मद्य विक्री होते हे भूषणावर नाही. यातून देशाची तरुण पिढी बरबाद होते आहे. शेवटी वाईट व्यसनांची बदनामी करून भारतीय संस्कृतीचे जतन करून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दूध प्या, निरोगी रहा आणि जल्लोष करा असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीस डॉ. आनंद वारके यांनी आयुर्वेदिक कढिचे वाटप केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Tuesday, September 3, 2024
उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले : प्राचार्य डॉ.संजय पाटील
बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य हे अजरामर आणि भारतीय पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेले साहित्य आहे .त्यांच्या या कार्याचा मान म्हणून त्यांना भारतरत्न दिला जावा. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध सक्षमपणे लेखणीची लढाई देऊन आपल्या मराठा व केसरी या दैनिकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या संयुक्त प्रतिमापूजन तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संकलित साहित्याच्या भितीपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे. डॉ.एस. ए.साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक हवलदार तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपस्थित डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे
श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन
साहित्यातून समाजाचाचे प्रतिबिंब दिसते : प्राचार्य डॉ .संजय पाटील.
साहित्य आणि समाज यांचा जवळचा संबंध असतो ,समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा प्रभाव साहित्यात पडत असतो आणि विद्यार्थ्यांना आव्हान केल्याप्रमाणे त्यांनी श्रावण महिन्याच्या या काळात आपल्या मनात घडणाऱ्या अनेक उलथापालथीचे चित्रण साहित्यात करावं असे आव्हान केल्यानंतर आपल्या कविता आमच्याकडे दिल्या, आणि त्या मी प्रकाशित केल्या त्याबद्दल लेखक कवी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि असाच प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन
प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित 'श्रावणधारा' या भितीपत्रकाच्या उद्घाटनाचे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले तर उपस्थिताचे आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस.जी. खानापुरे, प्रा. गौतम कांबळे, प्रा. अविनाश कांबळे , प्रा. ए .बी. माने, प्रा.सुहानी पाटील, प्रा .वैशाली कांबळे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Posts (Atom)
जगण्याच्या अस्वस्थतेतून चांगली कविता जन्म घेते : प्राचार्य डॉ. संजय पाटील
बिद्री.कवितेमुळे माणसाला जगणे सहज सोपे होते,कारण जगण्याची अस्वस्थता कवितेतून कवी मांडत असतो, महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने कव...
-
दूधसाखर महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील व डॉ. आनंद वारके प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील बिद्री. मराठी भाषा संवर्धन ...
-
बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणा...