Tuesday, September 19, 2023

साहित्य हा समाजाचा आरसा आहे. प्राचार्य डॉ. संजय पाटील

बिद्री. निसर्गातील प्रतिमा प्रतीकांच्या सहाय्याने समाज जीवनातील अनुभवाची मांडणी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे.आपल्या अवतीभोवतीच्या घटना साहित्यात आल्या पाहिजेत तेव्हाच ते साहित्य उत्कृष्ट ठरते ,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले. ते दूधसाखर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी लिहीलेल्या कवितांच्या "श्रावणधारा" या भितीपत्रकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यकार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रा.डॉ.आनंद वारके यांनी तर आभार प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दूधसाखर मध्ये मराठी विभाग आयोजित "श्रावणधारा "या भितीपत्रिकेचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील सोबत प्रा.डॉ.आनंद वारके, प्रा.डॉ.एस. ए.साळोखे, प्रा.डॉ.डी. एन .पाटील, प्रा. डॉ. प्रदीप कांबळे , प्रा.ए.बी. माने व इतर

No comments:

Post a Comment

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...