Tuesday, September 3, 2024

उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले : प्राचार्य डॉ.संजय पाटील

 बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य हे अजरामर आणि भारतीय पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेले साहित्य आहे .त्यांच्या या कार्याचा मान म्हणून त्यांना भारतरत्न दिला जावा. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध सक्षमपणे लेखणीची लढाई देऊन आपल्या मराठा व केसरी या दैनिकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या संयुक्त प्रतिमापूजन तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संकलित साहित्याच्या भितीपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे. डॉ.एस. ए.साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक हवलदार तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक  पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपस्थित डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे

श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन

साहित्यातून  समाजाचाचे प्रतिबिंब दिसते : प्राचार्य डॉ .संजय पाटील. 
साहित्य आणि समाज यांचा जवळचा संबंध असतो ,समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा प्रभाव साहित्यात पडत असतो आणि  विद्यार्थ्यांना आव्हान केल्याप्रमाणे त्यांनी श्रावण महिन्याच्या या काळात आपल्या मनात घडणाऱ्या अनेक उलथापालथीचे चित्रण साहित्यात करावं असे आव्हान केल्यानंतर आपल्या कविता आमच्याकडे दिल्या, आणि त्या मी प्रकाशित केल्या त्याबद्दल लेखक कवी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि असाच प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन 
 प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित 'श्रावणधारा' या भितीपत्रकाच्या उद्घाटनाचे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले तर उपस्थिताचे आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस.जी. खानापुरे, प्रा. गौतम कांबळे, प्रा. अविनाश कांबळे , प्रा. ए .बी. माने, प्रा.सुहानी पाटील, प्रा .वैशाली कांबळे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी विभाग आयोजित दूधसाखर मध्ये श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन करताना  प्राचार्य डॉ .संजय पाटील सोबत नॅक समन्वयक खानापुरे व विद्यार्थी

Thursday, August 29, 2024

महादेव मोरे यांना श्रद्धांजली

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वावर मराठी व हिंदी कवितांच्या प्रकाशन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय पाटील व इतर सर्व प्राध्यापक. मराठी व आणि हिंदी विभागाने या भित्तीपत्रकाचे नियोजन केले होते.

Monday, February 26, 2024

कुसुमाग्रजांचे लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी: प्राचार्य डॉ .संजय पाटील

 

दूधसाखर महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील व डॉ. आनंद वारके

प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त  मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले

बिद्री ः मराठी भाषा ही राजभाषा आहे. तिच्यातील लेखन, त्याचबरोबर तिची बोलीची परंपरा खूप दीर्घ अशी आहे .त्यामुळे दर्जेदार ,मानव मुक्तीचे , सामाजिक भान असलेले साहित्य ही जागतिक साहित्याला मराठी भाषेने दिलेली देणगी आहे. यामध्ये कुसुमाग्रजांचे  लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी   आहे .त्यांनी लिहिलेल्या कविता ,नाटके, ललित निबंध, कादंबऱ्या या सगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण आहेत म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त  मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले. अध्यक्षस्थानी नॅक सह समन्वयक डॉ. एस.ए.साळोखे होते.प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमचे पुजन केले तर कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी  महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा .डॉ .आनंद वारके यांनी मानले.



Wednesday, January 24, 2024

कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.-प्राचार्य संजय पाटील.

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर

बिद्री-विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच आयुष्यात घडलेल्या घटना यांच्या आधाराने कविता लिहावी. ज्यामुळे कविता जिवंत होते आणि रसिक वाचकांच्या पसंतीस उतरते.  व्यक्त झाल्यामुळे अनेक दिवस मनात साचलेल्या मानसिक त्रासापासून आपणमुक्त होतो ,असे प्रतिपादन दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी महाविद्यालयात मराठी विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली चव्हाण हिने ,द्वितीय क्रमांक प्रार्थना  कांबळे हिने तर  तृतीय क्रमांक नम्रता देसाई या विद्यार्थिनीने मिळविला. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.गौतम कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा . ए.बी.माने, ग्रंथपालअतुलनगरकर ,डॉ.एन.एम.पाटील, प्रा.किशोर पाटील, प्रा.दिगंबर पाटील, प्रा.अविनाश कांबळे, प्रा.सुहानी पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सिद्धार्थ पाटील हे प्रशासकीय कर्मचारी ही उपस्थित होते.

Wednesday, January 17, 2024

दूधसाखर महाविद्यालयात वाचन कट्टा उपक्रम उत्साहात

 

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित  वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील

बिद्री. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन कट्टा उपक्रम आयोजित केला होता.विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी  आणि वाचनामुळे जगणे समृद्ध होते हे कळावे यासाठी दूधसाखर महाविद्यालयात प्रतिवर्षी मा.प्राचार्य यांनी स्वखर्चातून बांधलेल्या  वाचनट्यावर हा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षीही हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. यामध्ये कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी वाचन कट्ट्यावर कांहीं सहित्यकृतींचे प्रकट वाचन केले. त्यामध्ये  सिमरन फराक्टे,सायली चव्हाण यांनी विंदा करंदीकर यांच्या  कवितांचे  व प्राजक्ता देसाई हिने अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरी संबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केला. आभार प्रा. डॉ.आनंद वारके यांनी मांडले.यावेळी प्रा. ए.बी. माने, प्रा.डॉ.शिवाजी परीट , प्रा.गौतम कांबळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले : प्राचार्य डॉ.संजय पाटील

 बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ...