Tuesday, September 3, 2024

उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले : प्राचार्य डॉ.संजय पाटील

 बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य हे अजरामर आणि भारतीय पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेले साहित्य आहे .त्यांच्या या कार्याचा मान म्हणून त्यांना भारतरत्न दिला जावा. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध सक्षमपणे लेखणीची लढाई देऊन आपल्या मराठा व केसरी या दैनिकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या संयुक्त प्रतिमापूजन तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संकलित साहित्याच्या भितीपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे. डॉ.एस. ए.साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक हवलदार तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक  पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपस्थित डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे

श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन

साहित्यातून  समाजाचाचे प्रतिबिंब दिसते : प्राचार्य डॉ .संजय पाटील. 
साहित्य आणि समाज यांचा जवळचा संबंध असतो ,समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा प्रभाव साहित्यात पडत असतो आणि  विद्यार्थ्यांना आव्हान केल्याप्रमाणे त्यांनी श्रावण महिन्याच्या या काळात आपल्या मनात घडणाऱ्या अनेक उलथापालथीचे चित्रण साहित्यात करावं असे आव्हान केल्यानंतर आपल्या कविता आमच्याकडे दिल्या, आणि त्या मी प्रकाशित केल्या त्याबद्दल लेखक कवी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि असाच प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन 
 प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित 'श्रावणधारा' या भितीपत्रकाच्या उद्घाटनाचे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले तर उपस्थिताचे आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस.जी. खानापुरे, प्रा. गौतम कांबळे, प्रा. अविनाश कांबळे , प्रा. ए .बी. माने, प्रा.सुहानी पाटील, प्रा .वैशाली कांबळे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी विभाग आयोजित दूधसाखर मध्ये श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन करताना  प्राचार्य डॉ .संजय पाटील सोबत नॅक समन्वयक खानापुरे व विद्यार्थी

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...